मंगळवेढा:-
मराठ्यांच्या पराक्रमाच्या खुना विविध राज्यातील शिलालेखात आढळून येतात असे प्रतिपादन इतिहासकार अमर साळुंखे यांनी मंगळवेढा येथे शंभू शाहू जयंती निमित्त खिलाडी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा या विषयावर व्याख्यान देताना व्यक्त केले.
सुरवातीस छत्रपती संभाजी महाराज मूर्तीचे पूजन शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष धनंजय खवतोडे,चंद्रशेखर कोंडूभैरी,राहुल ताड,संतोष रणदिवे,सतीश दत्तू,बाळदादा नागणे,ज्ञानेश्वर कोंडूभैरी,संभाजी घुले,रवि मोरे,सचिन यादव,बाळासाहेब ताड,सागर टाकणे,राजेंद्र आकळे,विजय हजारे उपस्थित होते.
दक्षिण भारतात मराठ्यानी बांधलेले किल्ले, निर्माण केलेल्या राजधान्या, वसवलेली गावे, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया,त्यांच्यावर आधारित शिलालेख,मराठ्यांची समाधी स्थळे अशा अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती व दक्षिण भारताकडे गेल्या काही वर्षात पर्यटक व इतिहास प्रेमींचा ओढा वाढलेला आहे.
परंतु सर्वात मोठा प्रश्न असतो तो तिथे जाऊन नक्की काय पहावे, भाषा आणि भूगोल या अडचणींवर मात करता येऊन जास्तीत जास्त किल्ले,मंदिरे,समध्या,शिल्पे,राजवाडे,राजधान्या इ. अभ्यासता यावीत म्हणून इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून दक्षिण भारतात विखुरलेली मराठ्यांच्या पराक्रमाची माहिती सर्वापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे आहे असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारत मुढे यांनी मानले.