पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला समाधान आवताडे शिवाय पर्याय नाही : प्रा.येताळा भगत - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

बुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला समाधान आवताडे शिवाय पर्याय नाही : प्रा.येताळा भगत

       
                                                           मंगळवेढा(प्रतिनिधी) पंढरपूर-मंगळवेढा हा मतदारसंघ कुणी वाली नसलेला मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रात ओळख होऊ लागली आहे टोकण निधी मंजूर झाला,उडविले फटाके, तत्वता मंजूरी मिळाली म्हणून कागद फडकविला,एवढेच काय तालुका दुष्काळी म्हणून जाहीर झाला तरीसुध्दा फटाक्यांची आतषबाजी करणारे लोकप्रतिनिधी या मतदारसंघाला लाभले हे आपले दुर्भाग्य आहे. केवळ आश्वासनांचा पाऊस पाडण्याशिवाय या लोकप्रतिनिधींनी काहीच केले नाही,त्यामुळे  या मतदारसंघात परिवर्तनाचं वादळ आलेलं आहे. या मतदारसंघाला समाधान आवताडेशिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठाम उभे रहा असे आवाहन शिवसेनेतचे माजी तालुका प्रमुख प्रा.येताळा भगत यांनी केले. ते अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना प्रा.येताळा भगत म्हणाले, आमदार नसताना समाधान आवताडे यांनी अनेक कामे केलेली आहेत. अनेकांचे संसार उभे करुन त्यांचे अर्थकारण मजबूत केले आहे. मतदारांनी यावेळी समाधान आवताडे यांना संधी दिल्यास या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार हे मी छातीठोकपणे सांगतो.पदव्यांचे भेंडोळेच्या भेंडोळे घेवून बेरोजगारांचे लोंढे शिकून बाहेर पडत आहेत. या युवकांना रोजगाराच्या संधी नाहीत. आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी रोजगार निर्मीतीचे काम केले नाही. समाधान आवताडे यांनी पंढरपूर येथे नोकरी महोत्सव घेवून १८०० तरुणांना नोक-या मिळवून देवून त्यांना आर्थिक स्थैर्य दिले. अपंगांना कृत्रीम हात-पाय देवून त्यांना मदतीचा हात देवून समाजामध्ये ताठ मानेने उभे केले. शेतक-यांचे मंदिर असणाऱ्या दामाजी साखर कारखान्याचे पावित्र्य जपण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. कारखान्याच्या निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्तीव्दारे ते पूर्ण करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हयात सर्वात जास्त निधी खेचून आणून योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविल्या आहेत. एवढी कामे करुनही कामाचा कधी गाजावाजा केला नाही. मात्र कांही मंडळी न केलेल्या कामांचा गाजावाजा करण्यात पटाईत आहेत. पंढरपूर तसेच मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक गावचा मी दौरा केला आहे. लोकांचा समाधान आवताडे यांना उस्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे तर  लोकप्रतिनिधीबध्दल प्रचंड चिड, राग व्यक्त होत आहे. या मतदारसंघात  परिवर्तन अटळ आहे हे चांगले समजले आहे. एक तरुण, तडफदार, विकासाचं नवं मॉडेल आणू पहाणारं नेतृत्व आपल्याला लाभले आहे, यासाठीच यावेळी समाधान आवताडे यांना संधी देण्याचे आवाहन  प्रा.येताळा भगत यांनी केले.


test banner