
सदर प्रसंगी दत्तात्रय जमदाडे सर म्हणाले, कोणत्या उमेदवाराच्या वयाबध्दल मी टिका टिपण्णी करणार नाही , कारण प्रत्येकाला या वार्धक्यातून जावेच लागणार आहे. परंतु या अशा वयामध्ये असे उमेदवार जनतेची कामे कशी करणार आहेत हा मतदारांनाच पडलेला प्रश्न आहे. सिमेवर रक्त सांडणा-या जवानांच्या पत्नीबध्दल अवमानकारक भाष्य करणा-यांना म्हणजेच त्यांच्या कुठुंबातील सदस्याला उमेदवारी मिळतेच कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. जवानांच्या सांडलेल्या रक्ताची शपथ आहे तुम्हाला अशा उमेदवाराला राजकारणातूनच तुम्ही उध्वस्त करा असे प्रतिपादन केले.
या प्रचार सभांमध्ये शिवसेनेचे नेते प्रा.येताळा भगत सर, प्रा.समाधान क्षिरसागर,शेतकरी संघटणेचे सिध्देश्वर हेंबाडे,मारुती गायकवाड, भागवत बेदरे, बाळासो घोडके,बाबासो बावचे,सुभाष चौगुले तसेच इतर मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी दामाजी कारखान्याच्या संचालिका स्मिता म्हमाणे,चंद्रकांत गरंडे, औदुंबर मोरे, शिवाजी हेंबाडे,दत्तात्रय हेंबाडे,पंपू मोरे,आण्णासाहेब टकले, पांडूरंग माने,गंगाराम माने,अनिल माने,सुरेश टकले,अविनाश कुचेकर,बिभीषण बेदरे,सुभाषभाऊ बेदरे,विकास बेदरे, दादासो बेदरे, संजय बेदरे, राजाभाऊ बाबर,रावसाहेब राजमाने, रविंद्र कुंभार, शिवाजी मोहिते, पैगंबर इनामदार, कासाय्या स्वामी, शिवाजी सरसंबी, सुभाष मोहिते, गणेश गांवकरे, भिमाशंकर कवचाळे, कामण्णा बनसोडे, तानाजी जाधव, अशोक पाटील, तानाजी जाधव, बसाण्णा पाटील, चनवीर लंगोटे, डॉ.रत्नाकर बनसोडे, राजकुमार स्वामी, अक्षय पवार आदिसह संबंधीत गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन,सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, समर्थक, कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर ठिकाणी सुत्रसंचालन अशोक उन्हाळे व सचिन मळगे यांनी केले.