मंगळवेढा:-
भारतातीय सैनिकांनी जम्मू काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर 'ऑपरेशन सिंदूर' राबवत शत्रू राष्ट्र असलेल्या पाकिस्तानवर एअरस्ट्राइक करत प्रत्युत्तर देऊन अनेक दहशतवादी अड्डे उद्धवस्त करून ऑपरेशन सिंदुर यशस्वी केल्याबद्दल वारी परिवार सायकल क्लब व माजी सैनिक संघटनेच्या वतीने भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात तिरंगा सायकल रॅली काढून सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
शिवालयापासून सुरु झालेली तिरंगा सायकल रॅली दामाजी चौक,शिवप्रेमी चौक,चोखामेळा चौक,मुरलीधर चौकातून गैबीसाहेब मशिदिजवळ समारोप करण्यात आला.
यावेळी भारत माता की जय,वंदे मातरम,हम सब भारतीय है,भारतीय सैन्यदलाचा विजय असो,वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा देऊन मंगळवेढ्यातील सर्व हिंदू मुस्लिम देशप्रेमी नागरिक सैदव सैनिकांसोबत आहोत हे दाखवून दिले.
विशेष म्हणजे प्रत्येक सायकलवरती लावलेले तिरंगे ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होते सदर सायकल रॅलीतून पहलगामच्या हल्यातील नागरिकांच्या जखमा ओल्या असताना क्षणार्धात पाकिस्तानात घुसून आपल्या भारतीय भुदल,नौदल आणि हवाईदलाच्या जांबाज आधिकाऱ्यांनी आणि जवानांनी दाखविलेल्या साहसाला आणि धैर्याला सलाम करून खरोखरचं देशप्रेमाची भावना जागी करण्यात आली.
यावेळी कर्तव्य बजावत असताना हल्ल्यामध्ये शहीद झालेले मुरली नाईक तसेच पहालगाम मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून राष्टगीताने शेवट करण्यात आला.
यावेळी सिंदुर ऑपरेशनच्या यशस्वीतेबद्दल पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी,सदस्य,वारी परिवार सायकल क्लबचे सदस्य,हिंदू मुस्लिम देश प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.