आ.समाधान आवताडे यांनी लावली म्हैसाळ योजनेतील गावांची शेतकऱ्यांच्या बांधावरती आधिकर्यांची बैठक. - संवाद न्यूज पोर्टल

ब्रेकिंग न्यूज

Post Top Ad

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

आ.समाधान आवताडे यांनी लावली म्हैसाळ योजनेतील गावांची शेतकऱ्यांच्या बांधावरती आधिकर्यांची बैठक.

   


                  मंगळवेढा:म्हैसाळ योजनेत समावेश असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यातील १९ गावांपैकी काही गावांना पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.

                   केवळ ऑफिस मध्ये बसून आधिकरी कागदावर बोलत असल्याने म्हैसाळ योजनेच्या सर्व प्रत्यक्ष गावात शेतकऱ्यानं समोर बैठक लावली असून वंचित सर्व शेतकर्यांनी लेखी तक्रारी सह शनिवार दि.३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता सलगर(बू) गावात उपस्थित राहण्याचे आवाहन आ.समाधान आवताडे यांनी केले आहे.

                   म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्यातील रेवेवाडी,हुन्नूर,लोणार,महदाबाद,पडोळकरवाडी,शिरनांदगी,मारोळी, चिक्कलगी,जंगलगी,सलगर बु,सलगर खु.,बावची,पौट,आ,लवंगी,शिवनगी,येळगी,सोड्डी,हुलजंती या १९ गावामध्ये १२७० एमसीएफटी एवढे म्हणजेच फक्त ६ टक्के पाणी या गावांना आजपर्यंत देण्यात आले आहे.

                  या योजनेतील पूर्ण पाण्याची मागणी केली आसता केवळ वेळोवेळी विविध तांत्रिक कारणांचा आधार घेऊन पाणीवाटपात एकदुसरे पणा करण्यात येत असल्याचे कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन कालवा सल्लागार समितीच्या बैठकी मध्ये अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

                  म्हैसाळ उपसा सिंचन पाणी योजने अंतर्गत मंगळवेढा तालुक्यासाठी सांगली जिल्हा जलसंपदा विभाग अंतर्गत म्हैसाळ कालवे उपविभाग वितरिका क्र.२ अन्वये तरतूद आसनारे पाणी पूर्णदाबाने देण्यात यावे त्याचबरोबर वरील भागांना या योजनेतून ज्या पद्धतीने पाणी मिळते,त्याच पद्धतीने पाण्याचे वाटप मंगळवेढा तालुक्यातील जनतेसाठी होणे अपेक्षित असताना पाणी वाटपाचा दूजाभाव केला जाऊ नये,पाणी वाटपा संदर्भात टेल टू हेड ही संकल्पना केवळ कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणी करून त्या पद्धतीने पाण्याचे वाटप करावे.

                 टंचाई परिस्थितीतून या भागातील गावांना पाण्याचे वाटप करण्याचा ठराव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये करून तसा प्रस्ताव तयार करण्याचे सांगली व सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले होते त्यावेळी संबधित मंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.

                 मात्र त्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी न झालेने शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत गेल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकाऱ्यांची बैठक लावून शेतकऱ्यांसोबत चर्चा करून अडचणी सोडविण्यात येणार असल्याचे आ. आवताडे यांनी सांगितले.


test banner